Tuesday, June 11, 2024

कष्ट किती हे कल्पवेना न्यूनता काही सरेना!

कष्ट किती हे कल्पवेना 
न्यूनता काही सरेना!ध्रु.

मनच आहे हे मुळाशी 
दुःख म्हणुनी या जीवासी
नाम मोफत घेववेना!१ 

औषधी देणे मनाला 
बोध करणे मानसाला 
विषयसुख परि सोडवेना!२ 

वासनाही नाचवीते 
ती शिवाहुन दूर नेते 
"मीपणा" का टाकवेना!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक १६३ (११ जून) वर आधारित काव्य.

सुखदु:खे कोणालाही सुटली नाहीत. जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासानेसुद्धा आणल्या तरी पण न्यूनता काही सरत नाही. दु:खावर आपण वरवर उपाय करतो परंतु आपल्या दु:खाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत.

सुखदु:ख हे वस्तूत नसून आपल्या मन:स्थितीवरच अवलंबून आहे
प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही, आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदु:ख देतो. ही आसक्ती काढणे याचेच नाव परमार्थ होय.

No comments:

Post a Comment