धरितो विषयांची आस
तो त्यांचा बनतो दास!ध्रु.
तो त्यांचा बनतो दास!ध्रु.
हवे हवे हा हव्यास
मान आवळी जणू फास
शांति कोठली चित्तास!१
सुख लाभाया जे केले
दुःख तयाने ओढविले
विषयी दुःखांची रास!२
लाल निखारे गमति फुले
मन त्यांना वेचु धजले
कळवळला आत्मा खास!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील १७४ व्या प्रवचनावर (२२ जून) आधारित काव्य.
विषयाची आस धरणे म्हणजे त्याचे दास होण्यासारखेच आहे. मनुष्य सुखाकरिता धडपड करतो, आणि अंती दु:खमय अशा विषयाची आशा करतो.
आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यांत आपल्याला सुख झाले नाही; मग विषय मिथ्या आहेत याची भगवंताने तुम्हांला प्रचीती नाही का दिली ? तरीसुद्धा तुम्ही या विषयांतच प्रपंच कसा सुधारेल असे मला विचारता, याला काय म्हणावे ? जे दु:खमयच आहे त्यात सुख कुठून मिळणार ?
No comments:
Post a Comment