सरू दे आता निष्फळ वटवट
सेवा काही घडावी!ध्रु.
सेवा काही घडावी!ध्रु.
जी जी वचने श्रवणी आली
कृतीविना ती वाया गेली
कृतीस स्फूर्ती द्यावी!१
एक नाम परि मुखी असू दे
राम स्मरता राम होऊ दे
आशा ही पुरवावी!२
संयमनाची लागो गोडी
सहज तुटू दे विकारबेडी
शांति मना लाभावी!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ९८ (७ एप्रिल) वर आधारित काव्य.
पुष्कळ वाचले, ऐकले पण कृतीत जर उतरले नाही तर त्याचा काय उपयोग? कृतीशिवाय समाधान नाही. श्रवण कोणी केले तर ज्यांनी त्याप्रमाणे कृती केली त्यांनी. कृतीशिवाय जे बोलतात त्यांचा नाश होतो.
स्वातंत्र्य आणि स्वैरवर्तन बाहेरून सारखीच दिसतात पण त्यांच्यामध्ये फार फरक आहे. स्वातंत्र्य हे पवित्र आहे तर स्वैरवर्तन हे अर्थात घाणेरडे आहे.
No comments:
Post a Comment