देह सावलीप्रमाणे हे, ज्ञान संतांना!ध्रु.
व्यवहारापुरती
तयांसी असते देहस्मृती
विकार म्हणुनी कधि न बाधती संतांचिया मना!१
जगाहुनी भिन्न-
तयांसी भक्ति हेंच अन्न
भक्ति भोजनी, भक्ति प्राशनी, भक्ति पुरे श्वसना!२
लोकांती, एकांती
बिघडत ना शांती
वेदांताचे मर्म खरोखर ठावे या सज्जना!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०४ (१३ एप्रिल) वर आधारित काव्य.
साधुसंत देहास सावलीप्रमाणे मानतात. सावलीला दुःख झाले म्हणून रडणे मूर्खपणाचे आहे; म्हणूनच संतांच्या मनावर सुखदुःखाचा परिणाम होत नाही. संतांना व्यवहारापुरतीच देहाची स्मृती असते. संत एकांतात जातात याचे कारण असे की लोकांतात त्यांना भेटणारे निराळे असतात व एकांतात भेटणारे निराळे असतात. लोकांतात संतांची शांती बिघडते असे मुळीच नाही, पण एकांतात भेटणाऱ्यांना लोकांतात भेटता येत नाही, म्हणून ते एकांतात जातात. संतांच्या वचनाचा ओढून ताणून अर्थ करू नये, त्याचा सरळ अर्थ घ्यावा. संतांचे ज्ञानच असे असते की त्यांना वेदांताचे मर्म आपोआप कळते.
No comments:
Post a Comment