Friday, April 10, 2026

कैसे वर्तावे या जगती

सज्जन सांगती कैसे वर्तावे या जगती!ध्रु.

बंधनास कारण 
मनाची ठेवण
सुखदुःख देइ न दुसरा असो द्यावे चित्ती!१

राबावे अखंड
जाळुनी पाखंड 
फलाशा न बाळगावी तीच थोर भक्ती!२ 

उगम जसा रामी 
विलय तसा रामी 
रामार्पण होण्याची ही सांगतात रीती!३

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १०१ (१० एप्रिल) वर आधारित काव्य.

बंधनास खरे कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण हे आहे. जाणिवेने जैसे घ्यावे। तैसे मनाने सुखदुःख भोगावे। अखंड राखावे अनुसंधान। येणे कर्म होईल सहज रामार्पण। प्रयत्नेविण राहो नये। फळाची आशा ठेवू नये। भगवंताला विसरू नये।

No comments:

Post a Comment