भगवान अर्जुनाला म्हणाले- श्रेष्ठच जर आपल्या कार्यापासून कर्मापासून च्युत झाला तर अज्ञानी कनिष्ठांनी काय करावे?
अर्जुना हे युद्ध सोडून जाऊन आपल्या सैन्याला पळपुटा धर्म शिकवायचा का?
अर्जुना हे युद्ध सोडून जाऊन आपल्या सैन्याला पळपुटा धर्म शिकवायचा का?
आपल्या वागण्याने जर लोकहितकारी आचारधर्माची रीत दाखविली नाही तर सामान्य लोकांच्या समोर आदर्श कोणता? - नियतीच हे युद्ध तुला खेळायला लावते आहे. चित्तवृत्ती आत्मस्वरूपी ठेव, पुन्हा रथारूढ हो. विजयी धनुष्य घे आणि लढण्याचा निश्चय आणि धर्माची प्रतिष्ठा वाढव.
भगवंताच्या वक्तृत्वाचा ओघ स्फुरणदायी होता. शब्दाशब्दातून रणावेश प्रकट होत होता-
+++++++
होई निःशंक तू, हो निरासक्त तू
अर्जुना झुंज तू ! अर्जुना झुंज तू!ध्रु.
कर्म करशील जे
अर्पि चरणी स्वये
चित्तशुद्ध्यर्थ रे अर्जुना झुंज तू!१
ऊठ रे झडकरी
सज्ज हो सत्वरी
वीरवृत्ति स्फुरे थोर राजन्य तू!२
पृथ्वि भारावली
दुष्टता मातली
पार्थ निर्मत्सरा शर्थिने झुंज तू!३
जे निरासक्त ते
कर्म निर्दोष ते
विसर ममता अता सोडि कार्पण्य तू!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
३०.१२.१९७२
No comments:
Post a Comment