मना संगती घ्यावे नाम मधुर मधुर गावे
त्या दोघांची ओळख घडता तन हलके व्हावे!ध्रु.
त्या दोघांची ओळख घडता तन हलके व्हावे!ध्रु.
राम रमवितो, कृष्ण ओढतो, हरि हा हारवितो
ओंकाराच्या पाठबळाने भक्त अभय होतो
चिंतन जेथे तिथे न चिंता, धरून चालावे!१
तन नत होते देवदर्शने, अमोल संस्कार
सदैव बसणे प्रभुचरणांशी नमन सांगणार
अनुसंधानी अगा अनंता भक्ता ठेवावे!२
कंठी धरतो भक्ता सुचवी तुळशीचा हार
कर पाठीवर प्रेमळ प्रभुचा असाच फिरणार
गंगायमुनांनी भक्ताला न्हाऊ घालावे!३
आळंदी देहू नि पंढरी घरीच असतात
माय रुक्मिणी तात विठोबा निश्चित असतात
असे घराला उपासनेने मंदिर पण यावे!४
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
No comments:
Post a Comment