हुंदके येतात कंठी, अश्रु गाली वाहती
प्रथम तू अन् मृत्युही मग गाठ तोडी शेवटी
बावरे माझी मती! १
प्रथम तू अन् मृत्युही मग गाठ तोडी शेवटी
बावरे माझी मती! १
तू दिलासी जो जिव्हाळा
तो न कोठे लाभला
एकटा मी तुजविना रे सांगु हे कोणाप्रती? २
दैन्य व्याधी अन् उपेक्षा
या विना कसली अपेक्षा
या त्रिशूले विद्ध केली त्यागमूर्ते आकृती! ३
भांडलो अन् तंडलो
हासलो हेलावलो
हट्ट ही जपले उराशी विसरु कैसा या स्मृती! ४
हातचा कर काढता तू
भग्न झाला भावसेतू
तू तिथे अन् मी इथे ना दो ध्रुवांची संगती! ५
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(लोकमान्य टिळकांच्या चरित्रावर आधारित आगरकरांच्या निधनाच्या प्रसंगावरील काव्य)
No comments:
Post a Comment