चरणि माथा ठेविला रे दशरथाच्या नंदना!
साह्य देई, साह्य देई आत्मबलसंवर्धना!ध्रु.
साह्य देई, साह्य देई आत्मबलसंवर्धना!ध्रु.
देहबुद्धी ओसरावी
व्यंकटी माझी नुरावी
संकटे जरि धाडिली तू झुंजण्या दे प्रेरणा!१
भोग भोगू दे सुखाने
भक्ति घडु दे तनमनाने
शरण आलो मी वरेण्या तूच देगा चेतना!२
सद्गुरूंचा बोध तू रे
अद्वयाचे सौख्य तू रे
सर्वकाली तुज स्मरावे सफल कर ही साधना!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक १४३ (२२ मे) वर आधारित काव्य.
आलेल्या परिस्थितीस तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धि कमी होणे. भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणे भोगायचेच आहे तर ते समाधानाने का नाही भोगू? दुखणे आले असता, त्याची उपेक्षा करावी म्हणजे आपोआप ते कमी होईल.
माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली, तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले. वास्तविक, माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वाभूती भगवद्भाव ठेवून कोणाचेही मन न दुखवणे, परमात्मा सर्व करतो अशी भावना ठेवणे.
No comments:
Post a Comment