विषयांचे सुख मायावी!
विषयांचे सुख मायावी!!ध्रु.
ते न खरे सुख, इंद्रियकौतुक
वरि वरि मोहक अंतरि घातुक
खरी जाण ही कशि यावी?१
मदिरेसम हे झिंग आणते
दरवेशापरि ते नाचविते
विटंबना मोठी दैवी!२
हीच न्यूनता प्रपंचातली
रामभक्तिने भरुनि निघाली
संतसाक्ष ध्यानी घ्यावी!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ८६ (२६ मार्च) वर आधारित काव्य.
प्रपंचातील विषयसुख हे खरे सुख नाही. न्यूनता नाही असं प्रपंचच नाही. विषयातील सुख परावलंबी विषयांवर अवलंबून असते. विषय हे नश्वर, आपल्यापासून कधीतरी जाणार. निदान आपल्याला तरी त्यांच्यापासून एक दिवस जावे लागणार. दुसरी गोष्ट म्हणजे विषयांचे सुख इंद्रियाधीन असते. इंद्रिये विकल झाली म्हणजे सुख कसे मिळणार? जे सुख होतेसे वाटते ते आपल्यातच असते आणि ते विषयांपासून मिळते अशी आपली फसवणूक मात्र होते. मी कोण? कशासाठी आलो? असा विचार करणे याला सारासार विचार म्हणतात.
No comments:
Post a Comment