अभिमान सर्व जावा
प्रभु अंतरी भरावा!ध्रु.
प्रभु अंतरी भरावा!ध्रु.
माझे न काही वाटो
तात्काळ राम भेटो
हा लाभ एक व्हावा!१
क्रोधास वाव नाही
सर्वत्र राम पाही
गुरुबोध हा ठसावा!२
गुरु चालवीत संगे
ध्यानात चित्त रंगे
याहून ना विसावा!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३२१ (१६ नोव्हेंबर) वर आधारित काव्य.
क्षेत्राच्या ठिकाणी काहीतरी अवगुण सोडावा. आपल्याला जी काही प्रिय वस्तु असते ती सोडावी. अभिमान येथे सोडावा व त्याच्या बदली देवाची कृपा घेऊन जावी. अभिमान जाणे म्हणजे देवाची कृपा होणे आहे. अभिमान सोडू म्हणून सोडला जात नाही. एक वेळ प्रपंचाचा अभिमान पत्करतो कारण तो लवकर जाण्याचा संभव असतो; पण सात्विक अभिमान सुटण्यास फार वेळ लागतो.
No comments:
Post a Comment