मानवाची व संधीची नेहमी चुकामूक होते. जन्मभर पश्चात्ताप करण्याची पाळी येते. तरुणपणी अनेक मोह जिवाला भुलवतात म्हणून साधना होत नाही. आळस व झोप हे मानवाचे मोठे शत्रू! तेच मित्र वाटतात. मानव जन्म आला हे मोठं भाग्य. थोडं मोठं झालं आपलं हित अनहित कळायला लागलं की सन्मार्गाला लागलं पाहिजे. आत्मज्ञानाचा आनंद मनुष्यच घेऊ शकतो. रोज श्रवण, चिंतन, मनन घडलं पाहिजे. मन ताब्यात ठेवणं ही मुख्य शिकवण.
----------------------------------------------------
करायचे ते आता कर रे बघू उद्याला म्हणू नको
आळस निद्रा शत्रू असती व्यर्थ तनाचे लाड नको
मरण न थांबे अवचित येते वदो वैखरी हरी हरी!
भक्तिपथावर चाल पुढे तू तोल सावरी तुझा हरी!१
नरजन्माचा पुरा लाभ घे, घडी अमोलिक साधावी
खरा कोण मी जाणुनि घेई परार्थ काया झिजवावी
मना आवरुनि तना सावरी मुरलीधर तव कैवारी
भक्तिपथावर चाल पुढे तू तोल तुझा सावरी हरी!२
अनुसंधानी खंड नसावा कृष्णच कर्ता हे जाण
वस्तू वस्तू ती परमेश्वर लाभ साधनेचा मान
गुरुचरणाचा घे घे आश्रय गुरुकृपेचा हात शिरी
जी मिळते ती संधि साधं रे करी साधना शर्थ करी!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.११.१९९३
----------------------------------------------------
करायचे ते आता कर रे बघू उद्याला म्हणू नको
आळस निद्रा शत्रू असती व्यर्थ तनाचे लाड नको
मरण न थांबे अवचित येते वदो वैखरी हरी हरी!
भक्तिपथावर चाल पुढे तू तोल सावरी तुझा हरी!१
नरजन्माचा पुरा लाभ घे, घडी अमोलिक साधावी
खरा कोण मी जाणुनि घेई परार्थ काया झिजवावी
मना आवरुनि तना सावरी मुरलीधर तव कैवारी
भक्तिपथावर चाल पुढे तू तोल तुझा सावरी हरी!२
अनुसंधानी खंड नसावा कृष्णच कर्ता हे जाण
वस्तू वस्तू ती परमेश्वर लाभ साधनेचा मान
गुरुचरणाचा घे घे आश्रय गुरुकृपेचा हात शिरी
जी मिळते ती संधि साधं रे करी साधना शर्थ करी!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
१८.११.१९९३