किती कितीदा सांगावे?
सुख विषयामधि नाही!ध्रु.
अंत न भोगा
स्थानचि रोगा
जो विषयदास त्यासी, शून्य दिशा दाही ! १
घ्या हो नामा
आळवा रामा
जर नाम कंठि धरले, मग बाधत ना काही! २
धुंदि निराळी
तृप्ति निराळी
जो वासनांस जिंके, तो समाधानी राही! ३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २३५, २२ ऑगस्ट वर आधारित काव्य.
प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे.
No comments:
Post a Comment