Friday, November 3, 2023

सुख विषयामधि नाही!

किती कितीदा सांगावे?
सुख विषयामधि नाही!ध्रु. 

अंत न भोगा 
स्‍थानचि रोगा 
जो विषयदास त्‍यासी, शून्‍य दिशा दाही ! १ 

घ्‍या हो नामा 
आळवा रामा 
जर नाम कंठि धरले, मग बाधत ना काही! २ 

धुंदि निराळी 
तृप्ति निराळी 
जो वासनांस जिंके, तो समाधानी राही! ३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्‍ण आठवले 

गोंदवलेकर महाराज प्रवचन क्रमांक २३५, २२ ऑगस्‍ट वर आधारित काव्‍य.

प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावे.

No comments:

Post a Comment