Thursday, July 11, 2024

राघवा, घालवि रे मीपणा!

राघवा, घालवि रे मीपणा!ध्रु.

संकल्पांचा उगम तेथुनी 
विषयांची ये माथी गोणी
अपार मग वेदना!१ 

तुझाच अंकित नित्य असावे 
तुला स्मरावे तुजला गावे 
अन्य नसे कामना!२ 

तव नामाची लाभो संगत 
भक्ति वाढवी जीवनि रंगत
नुरु दे अपुरेपणा!३ 

रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले 

गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने मधील प्रवचन क्रमांक ३६४ (२९ डिसेंबर) वर आधारित काव्य.

मीपणाचे विसर्जन करून सत्संगतीत म्हणजे नामात राहावे.
मीपणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पात्मक विषयच मनात येतात. 
भक्ती म्हणजे संलग्न होणे. थोडक्यात म्हणजे मीपणाचे विसर्जन केले पाहिजे. पण मनुष्य नसलेले कर्तेपण आपल्याकडे ओढून घेऊन सुखी किंवा दुःखी होतो. संतांजवळ राहिल्याने आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते. म्हणून आपण नेहमी सत्संगतीत राहावे. आपण हातात काठी घेतली तर उगीच कुणाला मारावीशी वाटेल ही झाली काठीची संगत. आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करू माळेने आपण कोणाला मारणार नाही.

No comments:

Post a Comment