जय जय रघुवीर समर्थ
विष ते अमृत झाले
वेणाचे भाग्य उजळले!ध्रु.
माय तात जरि दूर सारती
समर्थ प्रेमे धावत येती
घननीळाने नीलकवच जणु
कन्येसी घातले!१
जननिंदेची नव्हती पर्वा
देहाचा मग कुठला केवा?
वेणाचे तर तनमन, अवघे रामपदी वाहिले!२
माया तुटली, भ्रांती फिटली
समर्थरूपें माय भेटली
समर्थ पुढती, वेणा मागे टाकितसे पाउले!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
२७.०२.१९७४
समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित काव्यामधील हे एक काव्य.
No comments:
Post a Comment