परमार्थातही, अंधश्रद्धा नसावी.
वास्तविक देवाला जाण्याचा व संसारातील इष्ट गोष्टी घडण्याचा अर्थाअर्थी काही संबंध नसतोच! फक्त आपल्या मनातला भाव! याला काय म्हणायचं?
सत्संगाने नामस्मरण करावेसे वाटते. विवेक आपला खरा स्वार्थ कशात आहे ते सांगतो. नामस्मरणाने वृत्तीत पालट होतो.
आपणच आपल्या उद्धारासाठी परमार्थाचा मार्ग सोडता उपयोगी नाही.
********
देव देत नाही काही! देव घेत नाही काही!ध्रु.
ज्याचे त्यानेच चालावे
घर आपले गाठावे
हरिनाम घेतो त्याचा धीर वाढताच राही!१
काम आपुले करावे
कुठे मने न गुंतावे
हरिनाम घेता घेता वृत्ती पालटत जाई!२
ज्याचा जेवढा अभ्यास
फळ तेवढेच त्यास
हरिनाम घेता घेता शांति हृदयात येई!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
०५.११.१९९३
माजघरातली ज्ञानेश्वरी या परमपूज्य ताई दामले यांच्या प्रवचनांवर आधारित काव्य.
No comments:
Post a Comment