जे जे दिसते, नाश पावते, ती तर सगळी माया!ध्रु.
भगवंताच्या स्मरणि असावे
उठता बसता नामचि घ्यावे
सद्गुरु धरतिल शिरी आपुल्या नित्य कृपेची छाया!१
रुचेल रामा तेच करावे
साक्षित्वाने जगि वर्तावे
देव विसरता अहं बळावे जीवन जाते वाया!२
रामाविण जगि नसते कोणी
तोचि संकटी येत धावुनी
नाम तयाचे शांतिगृहाचा आहे सुदृढ पाया!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २५२, ८ सप्टेंबर वर आधारित काव्य)
No comments:
Post a Comment