समाधी काळ जवळ आला हे संतांना आतूनच कळते. देवाघरचे निमंत्रण त्यांच्या मनाला सर्वात आधी जाऊन पोचते. गणेश चतुर्थी आली! गरगर श्रीगणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना झाली. चैतन्याने रसरसलेली मूर्ती काहीजणांचा गणपती दीड दिवसांचा असतो. श्रीमहाराजांनी ऋषिपंचमी हाच दिवस ठरवून टाकला आणि सगळ्यांचा निरोप घेतला.
प्रसाद द्यावा प्रसाद घ्यावा
जावे आनंदाच्या गावा
गजानन निघे निजसदना
निरोप द्या द्या गजानना
जावे आनंदाच्या गावा
गजानन निघे निजसदना
निरोप द्या द्या गजानना
०००0000०००
सरे चतुर्थी येत पंचमी
मान द्यावया निमंत्रणा
निरोप द्या या गजानना!ध्रु.
देह यायचा देह जायचा
हा सृष्टीचा नियमच साचा
सहज आणला निदर्शना!१
इथेच आहे मजला स्मरता
दे अनुभव ती भाविकता
लागा लागा हरिभजना!२
आनंद आदि आनंद अंती
उगा कशाला करता खंती?
जोड कृतीची द्या वचना!३
रामकृष्ण ही आले गेले
नाम तयांचे तसेच ठेले
नामच दाविल गजानना!४
श्रीगजानन जय गजानन
गाता गाता भरले लोचन
गंध आगळा सुमनांना!५
प्रसाद द्यावा प्रसाद घ्यावा
जावे आनंदाच्या गावा
गजानन निघे निजसदना!६
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गीत गजाननमधून)
No comments:
Post a Comment