आवरेना मन, म्हणूनि शरण
येउनि राघवा धरिले चरण!ध्रु.
कैसा भेटशील?
कैसा पावशील?
ध्यास हाच लागे मज रात्रंदिन!१
मन जेथ गुंते
रहा देवा तेथे
विषयच व्हावा मला नारायण!२
प्रपंच नामात
देवा तूहि त्यात
भजनात लाभो सौख्य समाधान!३
रचयिता : श्रीराम बाळकृष्ण आठवले
(गोंदवलेकर महाराज प्रवचन २६६, २२ सप्टेंबर वर आधारित काव्य)
No comments:
Post a Comment